दुष्काळ
- Vishwa Marathi Parishad
- Mar 28, 2021
- 1 min read

जीव मुठीत धरुनी करी संकटावर मात
ठायी ठायी संघर्ष दिसे त्याच्या जीवनात
दुःखाचा डोंगर उभा या देहाच्या भवती
तीळतीळ मन तुटते पाहुनी तुझी स्थिती
झुंज तुझी काळाशी आहेत मोठ्या धैर्याची
उंबरठ्यात येऊन धडकते हि रात्र वैर्याची
निराश मन तुझे आणते मरणाच्या दारी
वाट पाहतात लेकरे पावले घेना माघारी
प्रवास तुझा खडतर होईल त्याचा शेवट
सावर तू कुटुंबास जाईल काळाचे सावट
नजरेत तुझ्या दिसु दे सुखाचे आभाळ
मागतो मागणं देवा दूर होऊ दे दुष्काळ
मागतो मागणं देवा दूर होऊ दे दुष्काळ.
अक्षय तेजाळे.
नं: 9673717091
Email: akshaytejale@gmail.com
ही कविता कशी वाटली ? लाईक करा, कमेंट करा आणि व्हॉट्सअॅप, फेसबुकवर शेअर करा.












Comments