top of page

दुष्काळ

Writer: Vishwa Marathi ParishadVishwa Marathi Parishad


जीव मुठीत धरुनी करी संकटावर मात

ठायी ठायी संघर्ष दिसे त्याच्या जीवनात


दुःखाचा डोंगर उभा या देहाच्या भवती

तीळतीळ मन तुटते पाहुनी तुझी स्थिती


झुंज तुझी काळाशी आहेत मोठ्या धैर्याची

उंबरठ्यात येऊन धडकते हि रात्र वैर्याची


निराश मन तुझे आणते मरणाच्या दारी

वाट पाहतात लेकरे पावले घेना माघारी


प्रवास तुझा खडतर होईल त्याचा शेवट

सावर तू कुटुंबास जाईल काळाचे सावट


नजरेत तुझ्या दिसु दे सुखाचे आभाळ

मागतो मागणं देवा दूर होऊ दे दुष्काळ


मागतो मागणं देवा दूर होऊ दे दुष्काळ.



अक्षय तेजाळे.

नं: 9673717091

Email: akshaytejale@gmail.com


ही कविता कशी वाटली ? लाईक करा, कमेंट करा आणि व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकवर शेअर करा.

Comments


टीप: विश्व मराठी परिषदेच्या ब्लॉगवरील पोस्ट केलेल्या सर्व लेखक / कवींच्या साहित्यामधील विचार हे लेखकांचे स्वत:चे आहेत. त्यासंदर्भात विश्व मराठी परिषद सहमत असेलच असे नाही.
Vishv Marathi Parishad logo transperent.

विश्व मराठी परिषद

कार्यालय  : ६२२, जानकी रघुनाथ, पुलाची वाडी, झेड ब्रिज जवळ, डेक्कन जिमखाना, पुणे, महाराष्ट्र - ४११००४
भ्रमणध्वनी : ७०३०४११५०६  | व्हॉटसअप : ७०६६२५१२६२ |  ईमेल : sampark@vmparishad.org
वेळ: सकाळी ११ ते सायं. ७ 
  • व्हॉटसअप
  • फेसबुक
  • इंस्टाग्राम
  • टेलिग्राम
  • युट्यूब चॅनेल
WhatsApp.png

© Vishwa Marathi Parishad

bottom of page