top of page

दुष्काळ



जीव मुठीत धरुनी करी संकटावर मात

ठायी ठायी संघर्ष दिसे त्याच्या जीवनात


दुःखाचा डोंगर उभा या देहाच्या भवती

तीळतीळ मन तुटते पाहुनी तुझी स्थिती


झुंज तुझी काळाशी आहेत मोठ्या धैर्याची

उंबरठ्यात येऊन धडकते हि रात्र वैर्याची


निराश मन तुझे आणते मरणाच्या दारी

वाट पाहतात लेकरे पावले घेना माघारी


प्रवास तुझा खडतर होईल त्याचा शेवट

सावर तू कुटुंबास जाईल काळाचे सावट


नजरेत तुझ्या दिसु दे सुखाचे आभाळ

मागतो मागणं देवा दूर होऊ दे दुष्काळ


मागतो मागणं देवा दूर होऊ दे दुष्काळ.



अक्षय तेजाळे.

नं: 9673717091

Email: akshaytejale@gmail.com


ही कविता कशी वाटली ? लाईक करा, कमेंट करा आणि व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकवर शेअर करा.

110 views0 comments

Recent Posts

See All
टीप: विश्व मराठी परिषदेच्या ब्लॉगवरील पोस्ट केलेल्या सर्व लेखक / कवींच्या साहित्यामधील विचार हे लेखकांचे स्वत:चे आहेत. त्यासंदर्भात विश्व मराठी परिषद सहमत असेलच असे नाही.
bottom of page