top of page

दिगंतर



रुखरूख अंतरीची

सरली पुन्हाच केंव्हा

सांडून टाकिले तू

मौनांतरास जेंव्हा


फुलली प्रभातकिरणे

मन दिगंतरास जाई

वाचाळता मनाची

होतसे मूढ तेंव्हा


सांगू कशी तुला मी

क्षण एक एक रेखी

गतकाळ संचिताचे

आठवात येती जेंव्हा


माझ्याच संपुटाला

मन दुष्ट दृष्ट लावी

अन जोडल्या मनातून

दाटलीच तेढ केंव्हा


पाखडती धग कोणी

कधी बीज मत्सराचे

पेरती यत्ने कोणी

क्षणकाल वैर केंव्हा


सा-याच वल्गनांना

मिळुनी उणावू दोघे

नच काळ ना कळीची

क्षिती बाळगूच केंव्हा


© सौ. राधिका अविनाश दाते

122 ड शनिवार पेठ

नेने घाट - पुणे 4111030

मोबा. नं.- 9881871914

Email.: radhikadate62@gmail.com


ही कविता कशी वाटली ? लाईक करा, कमेंट करा आणि व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकवर शेअर करा.


247 views0 comments

Recent Posts

See All
टीप: विश्व मराठी परिषदेच्या ब्लॉगवरील पोस्ट केलेल्या सर्व लेखक / कवींच्या साहित्यामधील विचार हे लेखकांचे स्वत:चे आहेत. त्यासंदर्भात विश्व मराठी परिषद सहमत असेलच असे नाही.
bottom of page