Vishwa Marathi Parishad

Mar 28, 20211 min

दुष्काळ

जीव मुठीत धरुनी करी संकटावर मात

ठायी ठायी संघर्ष दिसे त्याच्या जीवनात

दुःखाचा डोंगर उभा या देहाच्या भवती

तीळतीळ मन तुटते पाहुनी तुझी स्थिती

झुंज तुझी काळाशी आहेत मोठ्या धैर्याची

उंबरठ्यात येऊन धडकते हि रात्र वैर्याची

निराश मन तुझे आणते मरणाच्या दारी

वाट पाहतात लेकरे पावले घेना माघारी

प्रवास तुझा खडतर होईल त्याचा शेवट

सावर तू कुटुंबास जाईल काळाचे सावट

नजरेत तुझ्या दिसु दे सुखाचे आभाळ

मागतो मागणं देवा दूर होऊ दे दुष्काळ

मागतो मागणं देवा दूर होऊ दे दुष्काळ.

अक्षय तेजाळे.

नं: 9673717091

Email: akshaytejale@gmail.com

ही कविता कशी वाटली ? लाईक करा, कमेंट करा आणि व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकवर शेअर करा.

    1100
    5