Vishwa Marathi Parishad

Apr 17, 20211 min

दिगंतर

रुखरूख अंतरीची

सरली पुन्हाच केंव्हा

सांडून टाकिले तू

मौनांतरास जेंव्हा


 

फुलली प्रभातकिरणे

मन दिगंतरास जाई

वाचाळता मनाची

होतसे मूढ तेंव्हा


 

सांगू कशी तुला मी

क्षण एक एक रेखी

गतकाळ संचिताचे

आठवात येती जेंव्हा


 

माझ्याच संपुटाला

मन दुष्ट दृष्ट लावी

अन जोडल्या मनातून

दाटलीच तेढ केंव्हा


 

पाखडती धग कोणी

कधी बीज मत्सराचे

पेरती यत्ने कोणी

क्षणकाल वैर केंव्हा


 

सा-याच वल्गनांना

मिळुनी उणावू दोघे

नच काळ ना कळीची

क्षिती बाळगूच केंव्हा


 

© सौ. राधिका अविनाश दाते

122 ड शनिवार पेठ

नेने घाट - पुणे 4111030

मोबा. नं.- 9881871914

Email.: radhikadate62@gmail.com

ही कविता कशी वाटली ? लाईक करा, कमेंट करा आणि व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकवर शेअर करा.

    2470
    14