विश्व मराठी परिषद
Aug 13, 20201 min
"एक ओळ लिहिती राहिली पाहिजे......
माझ्या नंतरही...."
कारण दाही दिशांचे हे दार,
ठेवले आहे सताड उघडे.......
तरी काही कलत नाही,
एवढा अंधार येतो कुठून गडे....
म्हणूनच म्हणतो एक ओळ...........//1//
आयुष्य स्वप्नाचे असते तसेच ते
भावभावनांचे असते......
आयुष्य जगायला शिकवते, तसेच ते
मरायलाही शिकवते.....
शेवटी ते शाप की वरदान,
हेही आपणच ठरवायचं असते......
म्हणूनच म्हणतो एक ओळ.........//2//
आठवण तुझी येता.....
मी भूतकाळात जातो-आठवता त्या
आणाभाका, तुझ्यातच संसारचित्र रेखीतो...
व समाजासाठी मी तुझी आठवण,
पुसून टाकतो........
म्हणूनच म्हणतो एक ओळ.........//3//
जी माणसे ध्येयाकडे नजर ठेऊन,
वाटचाल करीत असतात.......
ती सतत धडपडत असतात, लोकांना
ती वेडपट वाटतात....पण ती घडत असतात...
आणि बाकीचे मात्र सडत असतात....
म्हणूनच म्हणतो एक ओळ.......//4//
सुनामी आयुष्याची सप्तपदी चालत राहते,
वर्षामागून वर्ष गिलत जाते....नौकरी, बेकारी,
उपासमारीने .."उमेदीचे मधुचंद्र".......
चोहोकडून बलात्कार, भ्रष्टाचार, लाचारी,
राजकारण व आत्महत्येच्या महापूरानी
साजरे केले जातात ..!!!
म्हणूनच म्हणतो एक ओळ लिहिती राहिली
पाहिजे माझ्या नंतरही...........//5//
कवी: वसंत कुलकर्णी
ईमेल: vasantkulkarni293@gmail.com
कविता आवडल्यास कमेंट करा आणि शेअर करा.
विश्व मराठी परिषदेच्या व्हॉट्सअॅप लिस्टला सामील होण्यासाठी आमचा 7066251262 हा क्रमांक सेव्ह करुन त्यावर Join VMParishad असा मेसेज पाठवा.